पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:माता-भगिनींच्या सहवासामुळे कार्यस्थळी अंगणाचा जिव्हाळा
भारतीय संस्कृतीत अंगण हे कुटुंबातील एकोप्याचे प्रतीक मानले जाते.अनेक साहित्यिकांनी अंगणाला स्त्रीविश्वाचे केंद्र म्हटले. तुळस हे तरअंगणाची महाराणी आहे. काही ऋषींनी मनालाही अंगणाचे रूपक दिले.तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहिले की— “बरनि न जाइ रुचिरअँगनाई, जहँ खेलहिं नित चारिउ भाई.” म्हणजे तेथे चारही भाऊ रोजखेळतात. त्या सुंदर अंगणाचे वर्णन शब्दांत करता येत नाही. काकभुशुंडीगरुडाला हा प्रसंग सांगतात. श्रीरामांचे अंगणात खेळणे तुलसीदासांना प्रियहोते. म्हणूनच त्यांनी “मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजिरबिहारी.” ही चौपाई रचली. भावार्थ असा की, हे दशरथांच्या अंगणात विहारकरणारे प्रभू श्रीरामांनी आमच्या अंगणातही यावे . महिलांच्याउपस्थितीमुळे कार्यस्थळाची संस्कृती आपुलकीची बनते. वातावरणालाजिव्हाळा लाभतो. भारताच्या एकूण कार्यबलात पुरुषांच्या तुलनेतमहिलांचे प्रमाण केवळ 10 टक्के आहे. अंगणाच्या प्रेरणेतून देशातीलमहिला कामगारांचा सहभाग वाढविण्याचा सामूहिक संकल्प करावा.
