पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपण अहंकारी असल्यास स्वतःचेच नुकसान करतो
अहंकाराबाबत आपल्या शास्त्रांमध्ये विविध प्रकारे अनेक गोष्टीसांगितल्या गेल्या आहेत. अभिमान हा भक्तीच्या मार्गातील मोठाअडथळा मानला जातो आणि संसारातही गर्व शेवटी दुःखच देतो.याच विचाराला तुलसीदासांनी एका वेगळ्या पद्धतीने मांडले आहे.त्यांनी अभिमानाचा संबंध क्लेश ,शोकाशी जोडला आहे – “संसृतमूल सूलप्रद नाना, सकल सोक दायक अभिमाना”. म्हणजे अभिमानहा जन्म-मरणरूपी संसाराचे मूळ आहे. अनेक प्रकारचे क्लेश आणिसर्व प्रकारचे दुःख निर्माण करणारा आहे. क्लेश पाच प्रकारचे मानलेगेले आहेत – अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हे पाचहीक्लेश मनुष्याला मानसिक वेदना देतात. म्हणूनच अहंकारी व्यक्ती शांतनसतात. बाहेरून ते शांत असल्याचा आव आणू शकतात. अंतर्मनातअस्थिरता असते. त्याचप्रमाणे शोक ही मनातील वेदनेची एक मानवीप्रतिक्रिया आहे. तुलसीदासांचा संदेश स्पष्ट आहे की, जर आपणअहंकारी असू, तर आपण दुसऱ्यांचे नव्हे तर स्वतःचेच नुकसानकरत असतो.
