July 4, 2026

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपण अहंकारी असल्यास‎ स्वतःचेच नुकसान करतो

0
h0ae9p_1781550450.jpg

अहंकाराबाबत आपल्या शास्त्रांमध्ये विविध प्रकारे अनेक गोष्टी‎सांगितल्या गेल्या आहेत. अभिमान हा भक्तीच्या मार्गातील मोठा‎अडथळा मानला जातो आणि संसारातही गर्व शेवटी दुःखच देतो.‎याच विचाराला तुलसीदासांनी एका वेगळ्या पद्धतीने मांडले आहे.‎त्यांनी अभिमानाचा संबंध क्लेश ,शोकाशी जोडला आहे – “संसृत‎मूल सूलप्रद नाना, सकल सोक दायक अभिमाना”. म्हणजे अभिमान‎हा जन्म-मरणरूपी संसाराचे मूळ आहे. अनेक प्रकारचे क्लेश आणि‎सर्व प्रकारचे दुःख निर्माण करणारा आहे. क्लेश पाच प्रकारचे मानले‎गेले आहेत – अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हे पाचही‎क्लेश मनुष्याला मानसिक वेदना देतात. म्हणूनच अहंकारी व्यक्ती शांत‎नसतात. बाहेरून ते शांत असल्याचा आव आणू शकतात.‎ अंतर्मनात‎अस्थिरता असते. त्याचप्रमाणे शोक ही मनातील वेदनेची एक मानवी‎प्रतिक्रिया आहे. तुलसीदासांचा संदेश स्पष्ट आहे की, जर आपण‎अहंकारी असू, तर आपण दुसऱ्यांचे नव्हे तर स्वतःचेच नुकसान‎करत असतो.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!