2011 vs 2026 Indian Youth: Chetan Bhagats Analysis
4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) पाहता पाहताकोट्यवधी समर्थकांचा पक्ष बनला. मात्र हे समर्थक प्रामुख्याने समाजमाध्यमांवर होते; रस्त्यावर नव्हते.सीजेपीने जंतरमंतरवर प्रत्यक्ष सभा घेतली व माध्यमांनीही तिचे चांगले वार्तांकन केले. तरीही तेथे केवळ शेकडोकिंवा काही हजार लोकच उपस्थित होते. भारतातीलएखाद्या मॉलमध्ये किरकोळ प्रसिद्ध व्यक्ती आली तरीयापेक्षा मोठी गर्दी जमते. मग ऑनलाइन आणि प्रत्यक्षउपस्थितीत एवढी तफावत का? जेन-झी पिढी आळशीआहे का? की ती फारशी असंतुष्ट नाही आणि तुलनेनेअधिक आरामदायी जीवन जगत आहे? मात्र असेम्हणणे सामान्यीकरण ठरेल. खरे कारण अधिक खोलवर आहे. सीजेपी समजून घेणे म्हणजे आजच्या जेन-झीपिढीला समजून घेण्याचा एक चांगला मार्ग आहे.
सीजेपीची तुलना 2011 मधील भ्रष्टाचारविरोधीआंदोलनाशी केली जात आहे. दोन्ही चळवळींनीलोकांच्या नाराजीला आवाज दिला. दोन्हींनी तरुणांना आकर्षित केले. दोन्ही पारंपरिक राजकीय चौकटीबाहेरउभ्या राहिल्या. मात्र सीजेपीला अण्णा हजारे यांच्या 2011च्या आंदोलनाइतकेही जनसमर्थन मिळाले नाही.यामागील मोठा प्रश्न असा आहे की, स्मार्टफोनच्या युगात वाढलेल्या डिजिटल-प्रथम पिढीचा राजकारणाशीसामना झाला की काय घडते? कारण 2011 आणि 2026यांतील हा मोठा फरक आहे. 2011 मध्ये देशातील बहुतांशलोक प्रमुख वृत्तवाहिन्या पाहत होते. त्यांच्या मथळ्यांवरचर्चा होत होती. जंतरमंतरवरील आंदोलन राष्ट्रीय बातमीबनत असे. कारण सर्वजण एकाच पडद्यावर लक्ष ठेवूनहोते. आज देश अल्गोरिदमने तयार वेगवेगळ्या डिजिटलविश्वांत जगत आहे. कोणी यूपीएससीची तयारी करणाराविद्यार्थी दिवसभर त्या विषयाचे व्हिडिओ पाहतो. कोणीस्टार्टअप क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना अनुसरतो.तिसरा सौंदर्यप्रसाधनांच्या मार्गदर्शक चित्रफितींमध्येरमतो. चौथा राजकीय विनोदी संदेशांच्या विश्वात जगतो.सर्वजण ऑनलाइन असतात; पण सर्वजण एकाचवास्तवाचा अनुभव घेत असतीलच असे नाही. त्यामुळेलोकांना एकत्र आणणे आणि संघटित करणे अधिककठीण झाले आहे. 2011 च्या आंदोलनाचा एकच मुद्दाहोता – भ्रष्टाचार संपवा. देशाला नेमका कशाचा रागआहे व काय हवे आहे, हे स्पष्ट होते. सीजेपीचे चित्रवेगळे आहे. त्याचे समर्थक बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा,प्रश्नपत्रिका फुटी, वाढती महागाई, राजकीय अहंकार,संधींचा अभाव आणि तरुणांतील निराशा अशा अनेकमुद्द्यांवर बोलतात. या सर्व चिंता खऱ्या आहेत. पणसमस्या अशी की, तक्रारी खूप आहेत. एका मुद्द्यावरदेशाला एकत्र आणणे हे दहा मुद्द्यांवर आणण्यापेक्षा सोपेअसते. दोन्ही चळवळींचा स्वरही वेगळा आहे.भ्रष्टाचारविरोधी आंदोलन गंभीर व जवळपासआध्यात्मिक स्वरूपाचे होते. लोक गांधी टोपी घालूनमोर्चांत सहभागी होत. त्यांनी उपोषणेही केली. त्याउलटसीजेपी विनोद, उपरोध व व्यंगातून पुढे आली. मात्र यापद्धतीत एक अडचण आहे. लाखो लोक त्यात सहभागीहोऊ शकतात. त्याला पसंती देऊ शकतात, ते पुढे पाठवूशकतात; पण प्रत्यक्ष चळवळीचा भाग बनतीलच असेनाही. लाखो तरुण रोजगार, परीक्षा व संधींच्या प्रश्नांशीजोडले जात असतील तर ते पूर्णपणे समाधानी आहेतअसे म्हणता येणार नाही. नाराजी खरी आहे. प्रश्न एवढाचकी ती व्यक्त कशी केली जाते. जुनी पिढी राजकारणाकडेप्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून पाहते – आंदोलन, निदर्शने,धरणे, मोर्चे. पण जेन-झी वेगळ्या साधनांसह वाढलीआहे – पोस्ट करणे, प्रतिक्रिया देणे, सामायिक करणे वआशय तयार करणे. याच ठिकाणी जुन्या आणि नव्यापिढीत गैरसमज निर्माण होतो. एखादा ज्येष्ठ विचारूशकतो, तुम्ही इतके नाराज असाल, तर रस्त्यावर कानाही? त्यावर एखादा तरुण म्हणू शकतो, माझी पोस्टलाखोंनी पाहिली असेल, तर रस्त्यावर येण्याची गरजकाय? 2011 मध्ये लोकांना आपले म्हणणे ऐकले जातनाही असे वाटले, तर ते एकत्र येत . 2026 मध्ये लोकांनाआपले म्हणणे ऐकले जात नाही असे वाटले, तर ते पोस्टकरतात. समाजमाध्यमे एका बाजूला आवाजवाढवण्याचे साधन बनली. दुसऱ्या बाजूला नाराजी व्यक्तकरून मन मोकळे करण्याचा मार्गही ठरली आहेत.इंटरनेट राजकीय ऊर्जेचा मोठा भाग स्वतःमध्ये सामावूनघेते. ते पूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलनात रूपांतरित होतअसे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
ही एखाद्या कमकुवत किंवा आळशीपिढीची कथा नाही. राजकारण वेगळ्यापद्धतीने व्यक्त करणाऱ्या पिढीची ही कथाआहे. निषेधाचा फलक उचलण्याआधी यापिढीचा हात आपल्या फोनकडेसरसावतो. मात्र प्रश्न कायम आहे -डिजिटल रोष खऱ्या जगात बदल घडवूशकतो का?

