पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कामाच्या दरम्यान स्वतःला पुन्हा ऊर्जावान बनवत राहा
अनेक लोक आठ-दहा तास सलग काम करतात आणि काही लोक दर एक-दोन तासांनी वारंवार ब्रेक घेतात. या दोन्ही स्थिती योग्य नाहीत. मानसशास्त्र म्हणते की, सलग काम करायचे असेल तर त्याचा कालावधी चार तासांचा ठेवा, याला ‘जमून काम करणे’ म्हणता येईल. चार तासांपर्यंत काम केले तर मानसिक थकवा येणार नाही. त्यानंतर ब्रेक घ्या आणि पुन्हा कामाला लागा. मध्यंतरात काय करावे? योगाचे आठ चरण आहेत. त्यात तिसरा चरण आहे ‘आसन’, चौथा ‘प्राणायाम’, पाचवा ‘प्रत्याहार’ आणि सहावा ‘धारणा’. ही चार कामे चार-पाच मिनिटांसाठी करा. आसन, म्हणजे शरीराची स्ट्रेचिंग करा. प्राणायाम, म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्याहारचा अर्थ होतो इंद्रियांना आतल्या बाजूला वळवा आणि धारणाचा अर्थ होतो मन एकाग्र करा. तुमचे मध्यंतर जर या चार गोष्टींनी भरलेले असेल, तर पुढच्या चार तासांसाठी तुम्ही एकदम ताजेतवाने राहाल. त्यामुळे जमून, मग्न होऊन काम करा, पण मध्ये-मध्ये दर चार तासांनंतर स्वतःला पुन्हा ऊर्जावान करत राहा.
